धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नांदा ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व गोंडवाना गणतंत्र पार्टी या चार पक्षांनी मिळून ग्राम विकास आघाडी च्या वतीने सतरा उमेदवार रिंगणात उतरविले होते व सरपंच पदाची उमेदवारी ही थेट जनतेतीतून लढविल्या गेली. यामध्ये सहा प्रभागातून मेघा नरेश पेंदोर ह्या मताधिक्याने विजय होत सरपंच पदाच्या दावेदार ठरल्या तर उर्वरित 17 सदस्यांपैकी 15 सदस्य ग्रामविकास आघाडीचे विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाला केवळ दोनच विजय उमेदवारावर समाधान मानावे लागले.
निवडणूक आयोग व शासकीय निर्देशानुसार उपसरपंच हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उपसरपंच पदासाठी विरोधकांनी दावेदारी सुद्धा न केल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून 40 मताने निवडून आलेले व मागील पंचवार्षिक योजनेत उपसरपंच पद भूषवलेले पुरुषोत्तम आत्माराम आस्वले यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ग्रामविकास आघाडीच्या मुख्य नेत्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सुरूवातीचे अडीच वर्ष पुरुषोत्तम आस्वले व उर्वरित अडीच वर्ष दुसऱ्यांदा निवडून आलेले रत्नाकर भास्कर चटप उपसरपंच म्हणून पदभार सांभाळणार आहे.
प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी व परिसरातील वातावरण बघता झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्तापालट होण्याचे चिन्ह समोर दिसत असताना सुद्धा विकास कामांना महत्व देत पक्ष भूमिका बाजूला सारत जनतेने ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूला भूतो न भविष्यातील निर्विवाद कल दिल्यामुळे विजय प्राप्त केलेल्या ग्रामविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारापुढे गावातील मुख्य चौकावर स्वच्छ मुत्रीघर, सर्व चौकावरील अतिक्रमण, रात्यांच्या कडेला पसरलेला कचरा, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पथदिवे, बीबी ते नांदा फाटा दुध डेअरी हा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारा रस्ता असे अनेक विकास विषयक कामे पुढे असल्यामुळे समोर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात या सर्व जनतेच्या समस्या व अपेक्षा ग्रामविकास आघाडी पूर्ण करतील अशी अपेक्षा नांदा येथील नागरिक करीत आहे.
नवनियुक्त महिला सरपंच मेघा नरेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, नवनिर्वाचित सदस्य रत्नाकर चटप, प्रकाश बोरकर, संजय मडावी, सुषमा दुर्वे, मंगेश दुर्वे, कैलाश डाखरे, जयश्री ताकसांडे, सुनिता महादेव आत्राम, अश्विनी पुरुषोत्तम मळावी, संजय कोवे, मंगला बंडू गायकवाड, मेघराज मडावी, सुजाता चौधरी या सर्व निवडुंन आलेल्या सदस्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते संजय मुसळे, निलेश ताजने, सुमेधर ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते आकाश बोनगींवार प्रा़. अनिल मुसळे, जगदीश नावांधर, हरिभाऊ बोरकुटे, सुरेश धोटे, जगजीवन शंभरकर, शंकर काकडे, अखिल शेख, लहुजी गोंडे, मनोहर झाडे, अनिल पेंदोर, प्रवीण कुरसंगे रवीकुमार बंडीवार, बंडूची लिंगे, रवींद्र चिंचोलकर, राहुल पाचवभाई, योगेश मुळे, बाबाराव मोहितकर विनोद इटनकर, भास्कर लोहबडे, पुरुषोत्तम पुट्टावार, संजय पोहाने, किसन गोंडे, मुरलीधर बोडके सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व नांदा ग्रामवासी यांनी अभिनंदन केले आहे. गावाच्या विकासाचा झंजावात मागील पाच वर्षाच्या च्या विकासाच्या वेगाच्या तुलनेपेक्षाही दुपटीने वाढवावा अशा अपेक्षाही गावकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.