Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: चंद्रपुरात १० डिसेंबरपासून श्रीमद भागवत कथा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून होणार मार्गदर्शन आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर -         हिंदू धर्मा...
प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून होणार मार्गदर्शन
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        हिंदू धर्मात पवित्रता, संपन्नता, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गौ मातेचे संगोपन करण्याचे काम श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था (लोहारा) चंद्रपूर ही संस्था करीत आहे. मागील २८ वर्षांपासून हे कार्य शासकीय मदतीतून नाही तर समाजातील दानशूर, गोपाल ग्रुपच्या सहकार्यातून सुरू आहे. या कार्याला समाजाचाही हातभार लागावा या उद्देशातून श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. १० ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाताळा (Datala) मार्गावरील बालाजी मंदिरासमोर (Balaji Mandir) असलेल्या श्री साईराम लॉन (Shri Sairam Lown) येथे दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून कथांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. (gau mata) (Shri Ujjwal Gaurakshan Sanstha Chandrapur) (Govatsa Shri Radhakrishanji Maharaj)

        हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्रालादेखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च असल्याचे नमूद आहे. मात्र, मागील काही वर्षांत गायींचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे आदरणीय प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेतून श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था लोहारा येथे सुरू करण्यात आली आहे. २८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेत आजघडीला तब्बल ५५० गोधन (गाय, बैल) आहेत. राज्यात गो हत्येला बंदी असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी तस्करी करताना पकडण्यात आलेल्या गायी, बैलांचा यात मोठ्या संख्येने समावेश आहे. (Pritisudhaji Maharaj Saa)

        या जनावरांच्या महिन्याकाठी पालनपोषणाचा खर्च सुमारे ३.५० लाख ते ४ लाख रुपयांच्या घरात आहे. हा सर्व खर्च समाजातील दानशुरांच्या मदतीतून भागविला जात आहे. आजघडीला या संस्थेत मजूर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गौरक्षणाच्या या पवीत्र कार्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. गोधनाला चारा उपलब्ध व्हावा या उद्देशातून १६ एकर जमीनीतून गवताचे उत्पादन घेतले जाते. परंतु, दाताळा मार्गावरील या शेतीतून लोहारा येथे चारा नेणे मोठी खर्चिक बाब झाली आहे. त्यामुळे या पवीत्र कार्यात अनेकांची मदत व्हावी, या उद्देशातून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सीए कमल किशोर राठी, ओम प्रकाश सारडा, मुन्ना बाबू भंडारी, प्रा. जुगल किशोर सोमानी, सीए दामोदर सारडा, हिम्मतभाई शाह, रोडमल गहलोत,दिनेश बजाज आदींची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top