गडचांदूर -
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान चे प्रणेते भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बंडू बुच्चे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले कि, थोरांचे विचार अंगीकारून आपणही भविष्यामध्ये त्यांच्यापासून काही ना काही प्रमाणात तरी आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे कार्य करावे, समाज हितासाठी शाळेतून निघावे असे मार्गदर्शन केले. शाळेतील सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत यांनी गांधी जयंती तथा लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून कठीण परिस्थितीमध्ये माणसाने कसं सावराव त्यातून आपला मार्ग कसा काढावा, जीवनामध्ये अहिंसेतून खूप मोठे काम होऊ शकते, प्रेमाने जग जिंकता येते असे सांगत विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची आठवण करून दिली. जीवनात ध्येय ठेवून कार्य करत राहावे असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लखमापूर शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यपाल पिंपळशेंडे, प्रभारी मुख्याध्यापिका कु. उरकुडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक बंडू बुच्चे, सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत, अंगणवाडी सेविका ठावरी, पिंपळशेंडे, आवारी तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. संचालन सातवीत शिकणारी विद्यार्थिनी कु. योगिता भारत ढाकणे हिने तर आभार यश महेंद्र चौधरी या विद्यार्थ्याने केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.