Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनसेचे जिवती तहसील व महावितरण कार्यालया समोर आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेत्तृत्वात शेतकरी आंदोलनात सहभाग  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी जिवती -         मनसे जिल्हा...
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेत्तृत्वात शेतकरी आंदोलनात सहभाग 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
जिवती -
        मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात जिवती तहसील कार्यालयात व महावितरण कार्यालय जिवती येथे शेतकऱ्यांचा वीज बिल संदर्भात तसेच काही शेतकऱ्यांना बँक मार्फत शेतीला कर्ज न मिळाल्याच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येत मनसे कार्यकर्ते सोबतच शेतकरी सहभागी  होते. 

        जिवती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर झाले नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करती असल्याचे लक्षात घेऊन शेवटी मागणीच्या पूर्ततेसाठी गुरुवार दि. 27 आक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

        आंदोलन सुरू झाल्याचे बघून संबंधित विभागाने सदर बाबची दखल घेत आंदोलनकर्त्यां सोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत तहसीलदार प्रविण चिडे, जिवती सीडीसी बँकेचे व्यवस्थापक राठोड, जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप, मनसे जिल्हाध्यक्ष मंदिप, शेतकर संघटना तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जहागीरदार, मनसे तालुकाध्यक्ष हकानी शेख, सिद्धेश्वर सलगर, महिला अध्यक्ष मटपल्ली, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नागेश खांडेकर, दत्ता गायकवाड व इतर कार्यकर्त्या समोर चर्चा  पार पडली. पिककर्ज मुदतवाढ साठी वरीष्ठांकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात येईल आणि मुदतवाढ मिळाली तर त्वरीत अर्जदार शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करण्यात येईल' असे आश्वासन मिळाल्याने सदर धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top