Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मृत्यूला निमंत्रण देत आहेत खड्डे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृत्यूला निमंत्रण देत आहेत खड्डे राजुरा-सास्ती मार्गाची अवस्था बिकट  खड्ड्यांमुळे चालक, पादचारी हैराण आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - ग...
मृत्यूला निमंत्रण देत आहेत खड्डे
राजुरा-सास्ती मार्गाची अवस्था बिकट 
खड्ड्यांमुळे चालक, पादचारी हैराण
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजुरा-सास्ती मार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. या मार्गावर जागोजागी मोठं मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावरून जा-ये करणारे दररोज ‘काय ते खड्डे, काय तो मार्ग, अन काय लोकप्रतिनिधी!’ म्हणण्याची पाळी वाहनचालकांसह नागरिकांवर वेळ आली आहे.
मध्यंतरी ता रस्त्याचा रुंदीकरण करून दुरुस्ती करण्याचे कार्य सुरु झाले होते, मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे आणि मध्यंतरी ते काम बंद झाले. या मार्गाबाबत सर्वसामान्यांमधून सातत्याने ओरड होत राहिली आहे. या मार्गावरून वेकोलि कामगार दिवस रात्र जीव मुठीत घेऊन कर्तव्यावर जात असतात. तसेच रामपूर, धोपटाला, सास्ती, बल्लारपूर ला जाणारे हि याच मार्गाने जात असतात. तालुक्याला तीनदा पूर आल्याने तीन वेळा या मार्गाने काही वेळा करिता वाहतूक सुरु होतीच. मात्र या रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर पावसाळ्यात या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण बनले आहे. या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटना दररोज घडत असून संबंधित विभागाने तकलादू उपाययोजना बाजूला सारून या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top