Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदुर, नांदाफाटा ते अंतरगाव मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर, नांदाफाटा ते अंतरगाव मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी दहा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन मनस...
गडचांदुर, नांदाफाटा ते अंतरगाव मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी
दहा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन
मनसे उपजिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी दिला इशारा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
सतत पावसाच्या अतिवृष्टीमुळे गडचांदुर नांदाफाटा आवाळपूर ते अंतरगाव मार्गावर मोठे मोठे गड्डे पडल्याने रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी दहा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूरचे उपविभागीय कार्यकारी अभियंताना निवेदना द्वारे कळविण्यात आले आहे. निवेदनात गडचांदूर ते अंतरगाव पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरती अनेक लहान मोठे खड्डे पळल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने त्या खड्यामध्ये पाणी साचल्यामुळे प्रवासी जनतेला नाहक त्रास सहन करावे लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी रस्त्याच्या नूतनीकरण करण्या संदर्भात सहा कोटी रूपये मंजूर झाल्याचे सांगीतले व रस्त्याचे बिबि गाव येथे भुमीपुजन ही करण्यात आले. सा.बां. विभाग यांनी कामही सुरू केले. अंदाजे दोन किलो मीटर पर्यंत डांबरीकरण करण्यात आले परंतु त्या समोर उर्वरीत असलेले पाच ते सहा किलो मीटर पर्यंतचे काम करण्यात आले नाही, तसेच बिबी ते नांदा फाटा पर्यंत नुतनीकरणाचे काम अजुनपर्यंत सुरू करण्यात आल्याचे दिसून येत नाही. पावसाळयाचे दिवस सुरू असल्याने रस्त्यावर अनेक लहाण मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. खडयात पाणी साचल्यामुळे त्या मार्गावर अल्ट्राटेक सिमेन्ट कंपनी, दालमीया सिमेन्ट कंपनीतील मोठे ट्रक, टिप्पर, टेंकर तसेच कंपनित काम करणारे कामगार तसेच शालेय विद्यार्थी फार मोठया प्रमाणात त्या रत्याने ये जा करित असतात. रस्त्यावरचे पडलेले खडडे चुकवताना अपघात होऊन जिव जाण्याची भिती असते. सदर रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे लोकांना सतत संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सदर बाबींची योग्य ती दखल घेऊन त्वरित रस्त्याचे खड्डे भुजवण्याची विनंती केली आहे. १० दिवसच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करून खड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा मनसे उपजिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंताना गडचांदुर यांना दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top