एच.एन. (राजेश) अरोरा - प्रतिनिधी
बल्लारपूर -
शिक्षणाकरिता दररोज शेकडो विद्यार्थी बल्लारपुर वरून चंद्रपुर ला जाणे येणे करीत असतात. मात्र विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार वेळेवर बस फेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांना ऑटो रिक्शा शिवाय पर्याय नसते. मात्र हा प्रवास त्रासदायक व महागडा असून धोकादायक ही आहे. विद्यार्थ्यांकरिता बस फेऱ्या वाढविण्याची मागणी बल्लारपुर शहर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व व्यापारी नेते नरेश मुंधडा यांनी बल्लारपुर एसटी वाहतुक नियंत्रक प्रफुल्ल फुलझेले यांचा निर्देशनास आणून दिले. तसेच निवेदन देत लवकरात लवकर बस फेऱ्या वाढविण्याची विनंती केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.