Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे झाले होते आतोनात नुकसान शेतकऱ्यांनी ...
चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित
ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे झाले होते आतोनात नुकसान
शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना दिले निवेदन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १५७ शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल विभागाकडून पंचनामे ही करण्यात आले होते. त्यात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमही देण्यात आली होती मात्र मात्र अजूनही त्यातील ५०-६० शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळालेली नव्हती. त्यानंतर लगेच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्या लोकांची रक्कम शासनाला परत पाठविण्यात आली असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग हद्दपार झाला असून वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी याबाबतीचे निवेदन तहसील कार्यालय तसेच माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रंजन लांडे, इर्शाद शेक, धनराज चिंचोलकर, चेतन जयपूरकर, संभा नागापुरे, लखन भोंगळे, बाबा डाहुले, राजू नवघरे, संतोष राऊत, जयंता बोरकुटे ईत्यादी उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top