सैन्य दलाचे जवानाने वाचविले प्राण
भद्रावती -
तीन दिवसापासून संततधार पाऊस येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नदी नाल्या वाहत आहे. यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहन टाकु नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना भद्रावती तालुक्यातील टाकळी येथून पानवडाळा या गावाकडे पाच प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो टाकळी नाल्याच्या पुलावरून टाकण्यात आला यावेळी पाण्याचा प्रवाह एकदम वाढून तो वाहुन जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ प्रवाशी असल्याचे सांगितले जाते. त्या प्रवाशांनी वाचवा वाचवा असा आरडाओरड केला पण पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने कोणीही पाण्यात उतरून त्यांना वाचविण्यास तयार नव्हते.
अशातच त्या प्रवाशाना वाचविण्यासाठी देवदूत म्हणून सैन्य दलाचे जवान निखिल सुधाकर काळे हे आले व त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवून पाचही प्रवाशांचा जीव वाचवीला. ते नुकतेच एक महिण्याची रजा घेऊन गावाला आले होते त्यांनी त्या पाच लोकांचा जीव वाचवला व त्यांना दोन्ही गावच्या व्यक्तीनी सहकार्य केले. यामुळे निखिल काळे व गावातील नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यालाच म्हणतात देव तारी त्याला कोण मारी.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.