वर्धा नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली
बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मागिल दोन तीन दिवसापासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले भर भरून वाहू लागल्याने भोयेगाव-धानोरा रोडवरील भोयेगाव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने भोयगाव-धानोरा पूल पाण्याखाली आल्याने आज सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी रांग लागली आहे. गडचांदुर, कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गी चंद्रपूर घूग्गुस कडे जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्या शोधावा लागत आहे. मात्र सतत पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.