ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा - डी.के. आरीकर
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्यात ओबीसी आरक्षणशिवाय नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन ओबीसी समाजाला निवडणुकापासून वंचित ठेऊ नये. राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगर पालिका व 4 नगर पंचायत निवडणुकीची घोषनेने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही व ओबीसी चे आरक्षण पक्के होत नाही तोपर्यत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी.के. आरीकर यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त याना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत एका शिष्टमंडळा मार्फत निवेदन देऊन केली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांचा 18आगस्ट रोजी मतदान तर 19 आगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका होणे म्हणजे 52 टक्के ओबीसी समाजावर अन्याय आहे असेही आरीकर म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.