आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
दानापूर एक्सप्रेसने बंगलोर येथे जात असलेल्या एका युवकाचा रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना 17 जुलैच्या रात्री दरम्यान विजासन येथे उघडकीस आली. अकबर अल्ली अन्सारी वय 19 वर्षे रा. हरिनपूर बिहार असे मृत युवकाचे नावं आहे.
बल्लारशा-भद्रावती-नागपूर मार्गाने धावणाऱ्या दानापूर एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून पडून सदर युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. सदर मृतक युवकाची ओळख पटवून त्यांच्या परिवारांना भ्रमनध्वनी वरून कळविण्यात आले मात्र त्यांच्या घरची आर्थिक परिस्थीती भद्रावती येथे येऊन शव घेऊन जाण्याची नसल्याने काही नागरिकांनी भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते रीयाज अन्वर यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आपले सहकारी मित्र रवी बघेल, पप्पू कांबळे, शाहिद बाबा अली, रियाज अन्वर उर्फ राजू, राम नैताम, बालू चापले, मुस्ताकीन अंन्सारी, इस्त्याक अन्सारी, जाफर शेख, दीपक मेश्राम, निषाद अन्वर यांच्या मदतीने त्या मृतकाच्या परिवाराला भद्रावती येथे बोलावून त्यांना ॲम्बुलन्सचा खर्च तसेच अंत्यविधीसाठी लागणारा खर्च अशी पन्नास हजारांची आर्थिक मदत करून सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.