Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चुनाळा येथे "जन-वन विकास" योजनेअंतर्गत गॅस वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथे "जन-वन विकास" योजनेअंतर्गत गॅस वितरण डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना; अंगनवाडी व शाळेला दिला लाभ विरेन्द्र पुणेकर -...
चुनाळा येथे "जन-वन विकास" योजनेअंतर्गत गॅस वितरण
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना; अंगनवाडी व शाळेला दिला लाभ
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना अंतर्गत वन विभाग राजुरा यांनी चुनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा व पाच अंगणवाडी केंद्रांना नुकत्याच छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात अन्न शिजविण्यासाठी गॅस चे वाटप राजुरा वन परीक्षेत्र अधिकारी एलकेवाड, वन क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. 
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी एलकेवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. लोकसभागातून वन्य जीव संरक्षण व वणाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, तलाठी विल्सन नांदेकर, वन रक्षक प्रवीण निखाडे, देवाजी शेंडे, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, ग्राम पंचायत सदस्य रवी गायकवाड, राजू कीनेकर, राकेश कार्लेकर, दिनकर कोडपे, सचिन कांबळे, उषाताई करमनकर, वंदनाताई पिदूरकर, जया निखाडे, संतोषी साळवे , संतोषी निमकर, कोमलताई काटम, अर्चनाताई आत्राम, पोलीस पाटील रमेश नीमकर, शिक्षक मडावी, सर्व अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी अनिल वांढरे, वैशाली मुरकूटलावार, रामा शेंडे, गजानन कार्लेकर, विजय चोथले, रवी पामुलवार, राजू कार्लेकर, श्रीराम मडावी, पवन संगरेन उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top