भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर आघाडीचा पुढाकार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर आघाडीच्या वतीने गलवान घाटीत शहीद झालेल्या भारतीय विर जवानांना आदरांजली देण्यात आली. दोन वर्षा पूर्वी गलवान घाटीत चीनच्या भ्याड हल्ल्याने 22 भारतीय जवान शहीद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला दोन वर्ष पुर्ण झाले असून शहीदांच्या आठवणींत एक दिवा शहिदांसाठी या उपक्रमांतर्गत आदरांजली देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्षा किरण बुटले, महानगर सचिव राकेश बोमनवार, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, संदिप आगलावे, आत्मनिर्भर आघाडीचे नितीन करिया, श्रीकांत देशमुख, राजेश मांगुळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.