Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे काळाची गरज - स्मिता चिताडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे काळाची गरज - स्मिता चिताडे धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ ...

  • जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे काळाची गरज - स्मिता चिताडे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आज संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट असून मोठ्या प्रमाणात विनाश होणार असून जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय येथे जगातील सर्वात मोठया लोकशाहीची राज्यघटना लिहणारे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच.बी. मस्की, एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे होते.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वामन टेकाम व विश्वनाथ धोटे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग सांगितले, बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा माधुरी पेटकर यांनी केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top