धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. या तापमानाच्या तडाक्यात कोरपना तालुक्यातील खिर्डी गावातील शेतकरी राजेंद्र मालेकर यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने शेतात असलेल्या स्पिनकलर पाईप, शेतीसाहित्यासह शिवार जळून खाक झाला आहे.
सदर घटना दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची माहिती तलाठी अन्सारी यांना देण्यात आली असून आगीचा पंचनामा करण्यात येणार आहे. आग लागण्याचे कारण अजून नसून अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.