Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात खिर्डी येथील धनराज मालेकर आणि शेखर ढवस यांचा जागीच मृत्यू संतापलेल्या लोकांनी केली वाहतूक ठप्प पोलिसांच्...
  • गडचांदूर कोरपना मार्गावर भीषण अपघात
  • खिर्डी येथील धनराज मालेकर आणि शेखर ढवस यांचा जागीच मृत्यू
  • संतापलेल्या लोकांनी केली वाहतूक ठप्प
  • पोलिसांच्या प्रयत्नाने 3 तासानंतर वाहतूक सुरू 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर कोरपना मार्गावर खिर्डी गावाजवळ मॉर्निंग वॉक ला गेलेल्या दोन युवकांना ट्रकने उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील लोकांना माहिती मिळताच संतापलेल्या लोकांनी वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. 
मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर शहरातील गांधी स्कॉलर अकॅडमी चे मुख्याध्यापक धनराज मालेकर वय 33 व गडचांदुर येथील मेडिकल व्यावसायिक शेखर ढवस वय 34 नियमितपणे सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले असता खिर्डी ते धामणगावच्या मधात सकाळी 5 वाजता सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघाताच्या विरोधात संतप्त नागरिकांनी वाहतूक ठप्प केली. जोपर्यंत अज्ञात वाहनाचा शोध घेऊन चालक-मालकास अटक करण्यात येत नाही तो पर्यंत वाहतूक सुरु होणार नाही अशी भूमिका संतप्त लोकांनी घेतल्यामुळे वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच गडचांदुर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी संतप्त लोकांना समजूत घातली आणि अखेर तीन  तासानंतर वाहतूक सुरू झाली. गडचांदुर पोलीस अधिकारी प्रमोद शिंदे व त्यांचे सहकारी फरार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत व पुढील तपास करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top