Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: देशसेवा करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देशसेवा करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी केंद्र सरकारची अग्निपथ भरती योजना तरुणांना तीन वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची संधी आमचा विदर...
  • देशसेवा करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी
  • केंद्र सरकारची अग्निपथ भरती योजना
  • तरुणांना तीन वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची संधी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
केंद्र सरकारतर्फे अग्निपथ भरती योजनेला अंतिम रूप देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत तरुणांना तीन वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या सेवेदरम्यान सैनिकाला अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. त्यांच्यापैकी काहींना सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय संरक्षण दलांकडे असेल. यामुळे सशस्त्र दलातील जवानांच्या प्रोफाइलची वयोमर्यादा कमी केली जाण्याची शक्यता आहे.
अग्निपथ हे भारतीय लष्कराच्या 'टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम' चे नवीन नाव आहे. तिन्ही सैन्यदलांतर्फे केंद्र सरकारला यासंदर्भात सादरीकरण देण्यात आले आहे. या योजनेनुसार, सैनिकांना अल्प-मुदतीच्या करारावर समाविष्ट केले जाणार आहे. तसेच या सैनिकांना प्रशिक्षित करुन विविध ठिकाणी तैनात केले जाणार आहे. विशिष्ट कार्यांसाठी विशेषज्ञ नियुक्त करण्याचा पर्याय देखील सैन्याकडे असणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सशस्त्र दलातील सैनिकांच्या भरतीवर विपरीत परिणाम झाला होता. सध्या तिन्ही दलांमध्ये मिळून १.२५ लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. आणखी काही बैठकांनंतर सरकार या प्रकल्पाची सविस्तर रूपरेषा जाहीर करणार आहे.
पहा ट्विटर
असा होणार तरुणांना फायदा
सैन्यदलातून सेवामुक्त झालेल्या सैनिकांना नागरी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळण्यासाठी मदत केली जाणार आहे. प्रशिक्षित लष्करी, शिस्तबद्ध मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार असल्याने अनेक कॉर्पोरेट्सनी अशा 'अग्निव्हर्स' च्या सेवांचा लाभ घेण्यास स्वारस्य दाखवले आहे.ही योजना देशसेवा करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी असेल. पण आधीच्या अस्तित्वात असलेल्या सेवेच्या नियमांमुळे ते असे करू शकत नव्हते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top