Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शक्तिशाली ब्लास्टिंग व धुळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शक्तिशाली ब्लास्टिंग व धुळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान बाखर्डी-पालगाव येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे दुर्लक्ष आमच...

  • शक्तिशाली ब्लास्टिंग व धुळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान
  • बाखर्डी-पालगाव येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
  • अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे दुर्लक्ष
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या ओपन मायनिंग मध्ये शक्तिशाली ब्लास्टिंग होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. चुनखडी वाहून नेणारे अवजड वाहतूक शेतातून होत असल्यामुळे धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. यामुळे पालगाव बाखर्डी परिसरातील शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे व याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. प्रशासनाने संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव व विजय मडावी यांच्या नेतृत्वात आज दिनांक 14 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे व तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची लाईम स्टोन खुली खदान बाखर्डी, पालगाव, तलोधी शेतशिवारला लागून आहे. चुनखडी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्तिशाली ब्लास्टिंग करण्यात येते यामुळे प्रचंड प्रमाणात चुनखडीचे चुनखडी दगडांचे तुकडे शेतामध्ये फेकले जातात शिवाय चुनखडी वाहून नेण्यासाठी अहोरात्र शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ते तयार करून ओव्हरलोड वाहतूक करण्यात येते. वाहतुकीमुळे प्रचंड धुळीचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे धुळीमुळे शेतीमालावर व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे उद्या पिकांवर जोडीचा तर साचलेला आहे पांढरे सोने काढलेले आहे. वाहतुकीमुळे शेतीचे उत्पादनावर परिणाम झालेला आहे. चुनखडी दगड काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात अनैसर्गिक मातीचे ढिगारे शेतामध्ये उभे करण्यात आलेले आहे. सिमेंट उद्योगामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे त्यामुळे परिसरातील शेती धोक्यात आलेली आहे. कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे व आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे याबाबत अनेकदा निवेदन देऊ नये कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. कंपनी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे आम्ही तुमची जमीन संपादित करणार आहोत तसेच नुकसान भरपाई देण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले हुं शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे आहे. सात मार्चला २०१९ रोजी जमीन अधिग्रहण बाबत ग्रामपंचायतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला मात्र याबाबत कुठलीच कारवाई झालेली नाही. वारंवार होणारे शक्तिशाली ब्लास्टिंग व प्रचंड धुळीमुळे शेतमालाचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव व विजय मडावी यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. सिमेंट कंपनीने चुनखडी खदान जवळील शेतजमीन तात्काळ अधिग्रहित करावी तसेच शेतमालाची झालेले नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संगीता मडावी, जित्रू मडावी, रवींद्र मरस्‍कोले, मारुती टेकाम, दिनकर टेकाम यांनी दिलेला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top