- "कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत शिवाजी महाविद्यालयात "पाणी वाचवा" विषयावर निबंध स्पर्धा
- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारे "कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय येथे एनएसएस विभागाच्या सहकार्याने "पाणी वाचवा" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक डॉ. एस.के. लाटेलवार आणि प्राध्यापक डॉ. एन. मनुरे यांनी केले. स्पर्धेत अनिरुद्ध वानखेडे यास प्रथम, सच्ची केवट हिला द्वितीय तर सागर जयपुरकर यास तृतीय स्थान प्राप्त झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी यांच्या हस्ते विजेत्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय सर्व सहभागी युवकांना एनएसएस इन्चार्ज गुरुदास बल्की यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यशस्वीतेकरिता नेहरू युवा केंद्र चंद्रपूरच्या राजुरा तालुका प्रतिनिधी कु. प्रिया जावरे यांनी प्रयत्न केले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.