Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे पडले महागात आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्...

  • शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा
  • फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे पडले महागात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारेंनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
बच्चू कडूंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे त्यांना महागात पडले. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असुन देखील 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप
बच्चू कडू यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी ते फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्ज देखील उपलब्ध करुन दिले होते. मात्र कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांपूर्वीच ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी त्यावेळी केलेला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे 2017 मध्ये बच्चू कडूंनी म्हटले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top