Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शांतीधामच्या विकासासाठी 30 लक्ष रुपये देणार - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शांतीधामच्या विकासासाठी 30 लक्ष रुपये देणार - आ. किशोर जोरगेवार शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बिनबा गेट येथील  शांतीधामच्या व...

  • शांतीधामच्या विकासासाठी 30 लक्ष रुपये देणार - आ. किशोर जोरगेवार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बिनबा गेट येथील  शांतीधामच्या विकासासाठी ३० लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. आज शनिवारी शांतीधाम समीतीच्या वतीने बिनबा गेट येथील शांतीधाम येथे कार्यालय व इमारत बांधकामाच्या भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. या प्रसंगी माजी खासदार नरेशबाबू पुगलीया, मनपाचे स्थायी समीती सभापती संदिप आवारी, मौक्षधाम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, सुरेंद्र खजानजी, दरबारजी, मनपा नगर सेवक अशोक नागापुरे, स्वीकृत नगर सेवक देवेंद्र बेले आदिंची उपस्थिती होती.
शांतीधाम समीतीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून बिनबा गेट यथील मुख्य शांतीधामच्या विकासासाठी प्रयत्न केल्या जात आहे. यात काही अंशी त्यांना यशही आले आहे. त्यांच्या या कार्यात लोकप्रतिनिधी म्हणून माझेही योगदान राहणार आहे. या शांतीधाममध्ये हिंदू परंपरे नूसार अंत्यविधी करण्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्या तरी येथे आणखी काम करण्याची गरज आहे. अंत्यविधी  करिता येणा-या नागरिकांच्या सोयीच्या दिशेनेही येथे काम करण्याची आवश्यकता आहे. माजी खासदार नरेशबाबू पुगलिया हे सुद्धा नेहमी या शांतीधामच्या विकासाठी प्रयत्नशील राहले आहे. त्यांच्या माध्यमातून येथे निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने या शांतीधामच्या मासीक देखरेखीची जबाबदारी घ्यावी याबाबात आपण आयुक्तांना सांगणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. येथील विकास कामासाठी आपण ३० लक्ष रुपये देणार असून या निधीतून येथे अत्यंविधी करिता येणा-या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विकास कामे केल्या जातील असेही ते

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top