Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंजाब काँग्रेस सरकारचा महानगर भाजपाने केला निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंजाब काँग्रेस सरकारचा महानगर भाजपाने केला निषेध पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी महानगर भाजपाने घातले देवाला साकडे महाकालीमातेचे केले पूज...

  • पंजाब काँग्रेस सरकारचा महानगर भाजपाने केला निषेध
  • पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी महानगर भाजपाने घातले देवाला साकडे
  • महाकालीमातेचे केले पूजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे महाकाली मातेचे विधिवत पूजन करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात याच वेळी निदर्शने आंदोलन करून बंगाली कॅम्प चौक येथे पंजाब सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ दीपक भट्टाचार्य, मनोरंजन रॉय, अनुप भट्टाचार्य, चंदन पाल, संतोष चक्रवर्ती, निहार हलदार, बिलाई चक्रवर्ती, कविता सरकार, महेंद्र जुमडे, ओमाते माझी, प्रमोद रॉय, सपन सरकार, दीपक विश्वास, परितोष मिस्त्री यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले, पंजाबात शेतकऱ्यांनी सुरक्षाकवच भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता रोकला. आंदोलक शेतकऱ्यांनीं  विरोधाची भूमिका घेतल्याने मोदींना फिरोजपुर यातील रॅली रद्द करावी लागली. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकारास पंजाब सरकार दोषी आहे. पंतप्रधान मोदींवर हा एक प्रकारे हल्लाच होता. त्यामुळे भाजपा पंजाब सरकारचा व काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विचार आहे. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करीत आहे. जागतिक पातळीवर मोदींनी नावलौकिक मिळविले असून सम्पूर्ण जगाला त्यांची गरज आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी महाकाली पूजन करण्यात येऊन देवाला साकडे घालण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top