Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवती नगर पंचायत वर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती नगर पंचायत वर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागेवर मानावे लागले समाधान भाजपा ला खातेही उघडता आले ...

  • जिवती नगर पंचायत वर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय
  • गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागेवर मानावे लागले समाधान
  • भाजपा ला खातेही उघडता आले नाही
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलाश राठोड यांनी आपली सत्ता राखली आहे. जिवती नगर पंचायत मध्ये काँग्रेसने ६ जागा व राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
जिवती नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील १२ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या असून भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही.
दरम्यान, मागील वेळी जिवती नगर पंचायत मध्ये पहिले अडीच वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती तर नंतरची अडीच वर्षे भाजपाची सत्ता होती. तरी पण आता भाजपाला खाते उघडता आले नाही ही चिंतनाची बाब असून राजुरा विधानसभा क्षेत्रात दोन माजी आमदार असून सुद्धा विधानसभा क्षेत्रात भाजपाला पिछाडीवर जावे लागल्यामुळे आता भाजपाला चिंतनाची गरज असल्याचे म्हटले जात आहे. 
यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे. तरी सर्व निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्या मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top