आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
'पाणी आडवा पाणी जिरवा' चा संदेश देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुब्बईच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. पानेवाडीत शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी केलेले बंधाऱ्याचे काम गावासाठी उपयुक्त असून, हा उपक्रम अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी परचाके, विस्तार अधिकारी शिक्षण संजय हेडाऊ, केंद्र प्रमुख चंद्रमणी देठे, वनरक्षक राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुरेश लखमापूरे, जिप उच्च प्राथमिक शाळा सुब्बईचे मुख्याध्यापक धिरज मेश्राम शिक्षक, राम माणिक, प्रविण मडावी, सहाय्यक शिक्षक रश्मी पिंपळकर, मारोती चापले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना वनराई बांधारा बांधण्यात हातभारही लावला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.