Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - नेर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातील अनेकां...




























रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
नेर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातील अनेकांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले 1977 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 
सोयाबीन काढणीला आले असतानाच जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला गेला. सोयाबीन मातीमोल झाले तर कपाशीच्या पात्या गळाल्याने मोठे नुकसान झाले. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top