Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आर्वी येथील २० वर्षापासून अतिक्रमित रस्ता अखेर मोकळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यात मौजा आर्वी येथे दुपारी १२ वाजता तहसीलदार राजुरा यांच्या पत्रानुसार पोलीस निरीक्षक र...

















































आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यात मौजा आर्वी येथे दुपारी १२ वाजता तहसीलदार राजुरा यांच्या पत्रानुसार पोलीस निरीक्षक राजुरा, पोलीस विभागाचे कर्मचारी, ग्राप आर्वीचे सरपंच, उपसरपंच, अहेरी चे कोतवाल अर्जदार, गैरअर्जदार यांच्या उपस्थितीत मागील २० वर्षांपासून वहिवाटीसाठी बंद असलेला सरकारी रस्ता मोकळा करण्यात आला. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजा आर्वी ते खैरगाव रिट कडे जाणारा सरकारी रस्ता मौजा आर्वी येथील गैरअर्जदार लटारू कान्हु जावडेकर यांची मुलगी प्रेमिला आनंदराव तावाडे यांनी सिमेंट पोल गाडून तारेचे कंपाऊंड बांधून कायमचे बंद केला होता. मा. तहसीलदार यांच्या पत्रानुसार सदर सरकारी रस्ता अर्जदार शेतकऱ्यांना वहीवाटी करीता मोकळा करण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात आज करण्यात आली. 
सदर रस्ता मोकळा करण्यासंदर्भात मा. तहसीलदार यांचे नोटीस अर्जदार व गैरअर्जदार यांना दि. २८ /१०/२०२१ रोजी देण्यात आले होते. मात्र गैरअर्जदार यांनी स्वतःहून स्वखर्चाने अतिक्रमित रस्ता मोकळा केला नाही शेवटी आज दि. ११ नोव्हेंबर रोजी मा तहसिलदार राजुरा यांचे पत्रानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता JCB च्या सहाय्याने वहीवाटी करीता मोकळा करण्यात आला. 
या प्रसंगी आर्वी ग्रामपंचायतचे सरपंच शालूताई लांडे, उपसरपंच भाष्कर डोंगे, सुभाष कालवले, पोलीस पाटील सेलुरकर, विनोद चिंचोलकर यासह अनेकांची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top