Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या पंज्याचे निशान दिसल्याने गावात दहशत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतात एकटे न जाण्याचे दिवंडी लावून आवाहन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - कोरपना तालुक्यातील भोयगाव, भारोसा, इरई भागातील ...
  • शेतात एकटे न जाण्याचे दिवंडी लावून आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील भोयगाव, भारोसा, इरई भागातील परिसरात वाघाच्या पंज्यांचे निशाण दिसल्याने गावातील नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. शेतात जाताना वाघाचे पाऊल खुणा दिसल्याने गावातील शेतकऱ्यात व नागरिकात दहशतीचे वातावरण आहे. काही लोकांनी प्रत्यक्ष वाघाला बघितल्याची गवाही दिली आहे. 
दोन वर्षापूर्वी भरोसा, भोयेगाव, पालगाव मार्गाने अल्ट्राटेक सिमेंट, आवारपुर कॉलोनी परिसरात वाघ आल्याने एकच खळबळ उडाली होती. वन विभागाला तब्बल 15-20 दिवसांनी त्याला पकडण्यात यश आले होते. गडचांदूर येथील वन विभाग चे अधिकारी यांनी गावात दिवंडी देऊन शेतकऱ्यांना संध्याकाळी 4 च्या नंतर व सकाळी 9 च्या अगोदर एकटे शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आहे. अतिशय आवश्यक असल्यास समूहात बाहेर जाण्यास सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी गावात मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या जीवसोबताच आपल्या जनावरांचीपण चिंता लागली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात एकटे जाण्यास भीती निर्माण झाली आहे. भरोसा येथील सरपंच देवराव निमकर याचेशी या संदर्भात माहिती दिली आहे की वाघ आल्याची माहिती मिळताच गडचांदूर येथील वन विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी गावातच ठीया मांडून बसले आहे. वाघाचे शोध घेण्याकरिता भारोसा गावालगतच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. यावेळी गावचे सरपंच देवराव निमकर, पोलिस पाटील सतीश गेडाम यांनी लोकांना सावध राहण्याची विनंती केली आहे. वाघाचे शोध लावण्याकरिता वन विभागा पूर्ण प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top