- परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
सावली -
शेतात काम करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना नुकतीच घडली. शालीकराम मनिराम चापले वय ३५ असे मृत शेतकऱ्याचे नाव असुन तो गेवरा खुर्द येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार धानपीकाचे रोवणे निंदणाच्या कामाला सुरुवात झाली असल्यामुळे अनेक शेतकरी शेतात काम करीत आहेत. सावली तालुक्यातील अनेक ग्रामीण भाग हा जंगल व्याप्त असुन गावालगत शेतीलगत जंगल आहेत अश्या परिस्थितीत शेतात काम करीत असतांना या भागात नेहमीच वन्यजीवाचा हौदोस दिसुन येत आहे. अश्याच घटनेत मृतक हा शेतात काम करण्यासाठी गेला असता शेतालगत असलेल्या जंगल परिसरात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच ठार करत जंगल परिसरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहीती मिळताच काही लोकांनी याबाबत माहिती वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तात्काळ 25 हजाराची मदत दिली. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबात व गावात शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.