Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मौजा लोणी शेतशिवारात शेंदरी बोंडअळी संदर्भात मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशनचा उपक्रम शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशन व्दा...
  • तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशनचा उपक्रम

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशन व्दारा बोंड अळी नियंत्रण संदर्भात शेतकरी बांधवांना योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या पिकाची निगा कशी राखायची या बाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. मौजा लोणी येथिल सतिश मुसळे यांचे शेतात सदर कार्यक्रम घेऊन कृषी सहाय्यक केळकर साहेबांनी शेतकऱ्यांना या संदर्भात योग्य अशी माहिती देण्यात आली. बोंड अळिचा उगम हा पतंग अवस्थेमधुन होतो.तिचा जिवनक्रम हा २८ दिवसांचा असुन याच अवस्थेत पतंगाचा नायनाट केला तर त्याचा फायदा आपणास निश्चीत जाणवेल.असे त्यांनी यावेळी सांगुन पतंगाचा नायनाट करणेसाठी शेतात पिवळे सापळे वापरणे फायद्याचे ठरेल असे सांगितले. पोर्णीमा व अमावश्येला नर व मादिचे मिलनाचा कालावधी असतो, याच काळात योग्य ती औषधी (सल्ल्यानुसार) फवारणी केल्यास यावर आपणास मात करता येईल असेही सांगितली.
यावेळी गावचे उपसरपंच अविनाश वाभिटकर, वासुदेव आवारी, दिनकर मुसळे, अंबुजा फाउंडेशन चे रागिट, मिटकर, वामन मुसळे, नथ्थु वडस्कर, साईनाथ वडस्कर, बंडु दवंडे, पद्माकर बोबडे, चाटारे पाटिल, काशिनाथ शिंदे यांचेसह बरेच शेतकरी बांधव उपस्थित होते.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top