- शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची मागणी
राजुरा -
कोरोना काळात बससेवा चालू नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी खाजगी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सामान्य जनतेला त्रास देत आहे. तालुक्यातील पाचगाव भुरकुंडा गोवरी मारडा येथील नागरिकांनी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांना संपर्क करून आपली व्यथा मांडली. आज जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसह आगार प्रमुखांना निवेदन देऊन तात्काळ बससेवा सुरु करण्याची मागणी केली. संबंधित विषयावर चर्चा करून दि. 08/09/2021 बुधवार सकाळी 9 वाजता पासून भुरकुंडा-पाचगाव बससेवा चालू करण्याचे तर गोवरी-मारडा बससेवा एका आठवड्यात चालू करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले.
यावेळी बल्लारपूर तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, युवासेना तालुका प्रमुख अमित (बंटी) मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमूख रमेश झाडे, शिवसेना शाखा प्रमूख पाचगाव मनोज कुरवटकर, युवा सेना शाखा प्रमूख पाचगाव सुनील गौरकर, शाखा सचिव पाचगाव संदीप घ्यार, आकाश जीवतोडे, अंकित कोटरंगे, गणेश ढोले, अंकुश शेंडे, हर्षल कोटरंगे आनंद आदे भुरकुंडा आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.