Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उभरत युवा नेतृत्व भाजप युवा मोर्चाने कायमच गमावल - विशाल निंबाळकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कमी वयात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने राजकणात आलेल्या अक्षयने भाजपयुवा मोर्चाच्या माध्यमातून ...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कमी वयात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने राजकणात आलेल्या अक्षयने भाजपयुवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र इतक्या कमी वयातच तो अनपेक्षित पणे आम्हच्यातून निघून गेला त्याच्या जाण्याने भाजप युवा मोर्च्याने एक उभरत नेतृत्व कायमच गमावलं असल्याची शोकसवेदना अक्षय खांडेकर यांच्या निधनानंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी व्यक्त केली. 
अक्षय हा अतिशय शांत स्वभावाचा होता. तो पक्षाने दिलेले जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडायचा. त्यामुळे पक्षानेही त्याला अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. तो जितका चांगला कार्यकर्ता होता. तितकाच चांगला मुलगा सुद्धा होता. मात्र वयाच्या  27 वर्षी दुर्धर आजाराने त्याला ग्रासले. त्याच्या जाण्याची बातमी अत्यंत वेदनादायी असून त्याच्या जाण्याने भाजपयुवा मोर्चाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून खांडेकर कुटूंबियांना  माता महाकाली सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना करतो असे विशाल निंबाळकर यांनी आपल्या शोकसंदेशातून म्हटले आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top