राजुरा -
दि. १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला विश्व हिंदू परिषद व बजरंगदल प्रखंड राजुरा द्वारे युवा पिढीला अखंड भारत दिनाचे महत्व समजावे आणि राष्ट्र पुनरुत्थानासाठी समाजातील सर्व तरुणांनी पूर्ण ताकदीने एकत्र यावे, देशाला परम वैभवाला नेण्यासाठी तन आणि मनाने समोर यावे यासाठी हा स्मरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पर्वावर भारत मातेची आरती, देश भक्ति गीत, हनुमान चालीसा चे सुंदर प्रस्तुतीकरण गायक मनोज मिश्रा व उमेश शाहा यांनी सादर केले.
कार्यक्रमात विहिंप जिल्हा मंत्री सत्यनारायण खेंगर, रूपेश भाकरे जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख, विनय आक्केवार प्रखंड संयोजक बजरंग दल, अंकुश घटोले प्रखंड मंत्री विहिंप, सारंग रामगीरवार प्रखंड उपाध्यक्ष, विहिंप, प्रफुल घोटेकर नगर संयोजक बजरंग दल, संदेश दुर्गे प्रखंड सह संयोजक, व्यंकटेश कदम प्रखंड सप्ताहिक मिलन प्रमुख, शुभम आक्केवार शाखा प्रमुख प्रदीप देशपांडे रा. स्व. संघ संयोजक, सोमेश्वर आईटलावर, सचिन भटारकर, जयपाल ठाकुर, अनिल पवार, चेतन निमकर, विजय हजारे, श्रीकांत रेक्कलवार इत्यादी उपस्थित होते.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.