विरुर स्टेशन -
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे आज सांयकाळ चार च्या सुमारास 28 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.
मंगला हनमंतु मडावी असे विवाहितीचे नांव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील हनमंतु मडावी हा मागील तीन वर्षांपासून शेतमजूर म्हणून विरुर येथे काम करीत आहे व एका घरी किरायाने आपल्या परिवारासह वास्तव करीत असताना आज अचानक मंगला हिने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशन ला कळताच विरुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले असता मृतकीने लिहलेली एक चिट्ठी आढळली यात स्वतःच्या आजारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे उल्लेख सामोर येत आहे. विरुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.