Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे "शिवभोजन थाळी" चा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते उ्दघाटन गरिबांना फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता येणार धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्र...
  • गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते उ्दघाटन
  • गरिबांना फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता येणार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महाविकास आघाडी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली 'शिवभोजन थाळी' केंद्राचा नुकताच गडचांदुरात शुभारंभ झाला. कोरोना व सद्या बिकट परिस्थितीत अभाव ग्रस्त नागरिकांच्या पोटात दोन घास सहज उपलब्ध व्हावे करीता महाराष्ट्र शासनाद्वारा शिवभोजन थाळी सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिली आहे. गोरगरीब जनतेला माफक दरावर अर्थात फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता यावी, या उदात्त हेतूने शासनाने सदर उपक्रम सुरू केला. कोरपना या आदिवासी बहुल तालुक्यात प्रथमच गडचांदूर या औद्योगिक नगरीत अलीकडेच शिवभोजन थाली केंद्राचे उदघाटन गडचांदुरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते पार पडले. 
नगर परिषदेच्या जवळ असलेल्या मेहेर भोजनालय अंतर्गत ही योजना सुरू केल्याचे केंद्राचे संचालक बबलू बनकर यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे  नगरसेवक पापय्या पोन्नमवार, गणेश गादीगोणीवार, सुनील तायडे सर, संगीता बनकर मॅडम, केंद्राचे संचालक बबलू बनकर आदी उपस्थित होते. गडचांदुर परिसरातील गोरगरिब नागरिकांनी या योजनेचा  भरपूर लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सविता टेकाम यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top