Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वनविभागाची जमीन कोट्यवधीत विकली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तब्बल ३४ लोकांना विकून ५ कोटी रुपयांची फसवणूक नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - वनविभागाच्या जमिनीचे बनावट दस...

  • तब्बल ३४ लोकांना विकून ५ कोटी रुपयांची फसवणूक
  • नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
वनविभागाच्या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करीत ही जमीन परस्पर विकल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हा भूखंड तब्बल ३४ लोकांना विकून त्याद्वारे ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी करून नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

राजश्री अमरदीप कांबळे (वय ५२), मनीषा अमरदीप कांबळे (वय ३०), किरण समर्थ (वय ३०), मेंढे, वासुदेव इंगोले (वय ४५), शाहनवाज खान (वय ४५), एसआरबी कंपनीचा संचालक संदीप सहदेव मेश्राम (वय ३८), आकाश भारद्वाज (वय ४०) आणि राम किशोर रहांगडाले (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षा विजय भुरे (वय ३६, रा. शासकीय वसाहत, रविनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक वर्षांपूर्वी गोरेवाडा येथील वनविभागाची काही जमीन महापालिकेने घेतली होती. मात्र, महापालिकेने त्या जमिनीचा वापर न केल्याने ती पुन्हा वनविभागाला परत करण्यात आली. याची माहिती आरोपींना होती. आरोपींनी संगनमताने त्या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर त्या जमिनीच्या विक्रीचे व्यवहार आपापसात करून २०१८मध्ये त्यावर लेआउट टाकले. त्यावरील भूखंडांची लोकांना लाखो रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महापालिकेने ती जमीन वनविभागाला परत केली. वनविभागाने जमिनीचा ताबा घेण्यापूर्वी जमिनीची मोजणी केली असता, लोकांना ही जमीन आपल्या मालकीची नसल्याचे समजले. त्यांनी आरोपी राजश्री व इतरांशी संपर्क साधून पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांत तक्रार करण्यात आली. आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनात चौकशी करून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top