- स्व. कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे यांचा पाचवा स्मृती दिन
अँड. चटप म्हणाले, सध्या कोरोनाच्या महामारीने अनेक कुटूंब अडचणीत आले आहेत. काहींनी आपले आप्तेष्ट गमावलेत. तर काही जणांपुढे रोजगारीचे संकट उभे राहीले आहेत. अशा कठीण प्रसंगी एकमेकांचे सहकार्य करण्याची भावना समाजातील प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज आहे.
शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या वतीने राजुरा तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम अशा बागुलवाई कोलामगुड्यावरील बत्तीस कुटूंबांना आज (ता.५) तूर दाळ, साखर, तेल, तिखट, मीठ, आलू, कांदे, साबण, बिस्कीट अशा जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, नगरसेवक भाऊजी कन्नाके व मधूकर चिंचोलकर, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, तालुका उपाध्यक्ष दिलीप देठे, मनोज मून, भीमराव बंडी, ऋषी बोरकुटे, मधूभाऊ जिवतोडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आदिम कोलाम बांधवांना मदतीचा हात देऊन सहकार्य केल्याबद्दल बागूलवाईचे गावपाटील भोजू जंगू आत्राम व अन्य कोलाम माता भगिनी व बांधवांनी समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.