Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार मित्रांना जलसमाधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकाचा मृतदेह सापडला; तिघांचा शोध सुरू आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - वाकी परिसरात सहलीला आलेल्या नागपूर येथील चार मित्रांचा बुडून मृत...

  • एकाचा मृतदेह सापडला; तिघांचा शोध सुरू
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
वाकी परिसरात सहलीला आलेल्या नागपूर येथील चार मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कन्हान नदीपात्रातील डेंजर डोहात मंगळवारी सकाळी घडली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून तिघांचा शोध सुरू आहे. तोफीक आशिफ खान (वय १६, शांतीनगर, नागपूर), प्रवीण गलोरकर (वय १७, जयभीम चौक, यादव नगर, नागपूर), अवेश शेख नासीर शेख (वय १७, वीएचबी कॉलनी, नागपूर) व आरिफ अकबर पटेल (वय १६, जयभीम चौक, यादव नगर, नागपूर) अशी मृतकांची नावे असून अवेश शेख नासीर शेख यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेले तेजू पोटपसे (वय २०), थायान काजी (वय १८), पलाश जोशी (वय २०), विशाल चव्हाण (वय २५) व मृतक असे एकूण आठ तरुण वाकी येथे सहलीला आले होते. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना द्वारका वॉटर पार्क बंद दिसले. यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. नदीजवळ पोहोचताच आणि वाहते पाणी पाहून चौघांनी पोहायचे ठरवले. त्यानुसार आठ पैकी चार युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज लावता न आल्याने बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.

पावसामुळे शोधकार्यात अडचण
पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.

फलकाकडे होतेय दुर्लक्ष
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगटडोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहे. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडतात. प्रशासनाने या परिसराकडे येण्यास बंदी घालण्याची मागणी होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top