Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: विकृत मनोवृत्तीचा कळस! 'त्या' नराधमाने गळा चिरून केला मृतदेहावर अत्याचार....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - आलोक विकृत मनोवृत्तीचा होता. सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्याने सासू व मेहुणीचा गळा चिरला. त्याने मोबाइ...

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
आलोक विकृत मनोवृत्तीचा होता. सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्याने सासू व मेहुणीचा गळा चिरला. त्याने मोबाइलमधील अश्लील क्लिप बघितली. त्यानंतर मेहुणीच्या मृतदेहावर अत्याचार केला. घरी परतल्यानंतर त्याने आधी पत्नी व नंतर मुलांची हत्या केली. यावेळी काही काळ त्याने अश्लील क्लिप बघितली. पत्नीशीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही वेळाने तो शुद्धीवर आला. आपण हे काय केले, याची त्याला जाणीव झाली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तांत्रिक तपासादरम्यान समोर आली.

आलोकने आठ दिवसांपूर्वीच कुटुंबासह सासू व मेहुणीच्या हत्येचा कट आखला होता, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने ऑनलाइन चार चाकू बोलाविले. तीनच दिवसांपूर्वी चाकू त्याच्या घरी आले. तेव्हापासून तो संधीच्या शोधात होता. रविवारी त्याने चिकन आणले. त्याच्या पत्नीने भाजी बनविली. या भाजीत त्याने गुंगीचे औषध मिसळले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर काही वेळातच तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याने पत्नी व मुलांची हत्या केली.

रविवारी आलोकने सर्वाधिक वेळा बबलूच्या मोबाइलवर संपर्क साधला. हा बबलू कोण? आलोकने त्याच्याशी कशासाठी संपर्क साधला? याचा तपास पोलिस करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत बबलूबाबत माहिती काढण्यात पोलिस अयशस्वी ठरले. मेहुणी व सासूची हत्या करण्यासाठी आलोकने बबलूची तर मदत घेतली नाही ना? अशी शक्यताही आहे.

फोन आला अन्...
आलोक हा मेहुणीकडे तगादा लावायचा. त्यामुळे रविवारी रात्री मेहुणीने बहिणीला फोन करून आलोक हा त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर आलोक व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. तो विकोपाला गेला. त्याने आधी पत्नी व नंतर मुलांची हत्या केली. त्यानंतर मेहुणीसह सासूलाही संपविले. तत्पूर्वी २५ मे रोजी आलोक त्रास देत असल्याची तक्रार त्याच्या मेहुणीने तहसील पोलिसांत केली. तहसील पोलिसांनी आलोकविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली होती. याचाही राग आलोकच्या मनात होता.

अमरावतीचे घर बँकेने केले जप्त
लग्नानंतर आलोक पत्नीसह अमरावतीला गेला. काही दिवस त्याने गांधी चौकातील एका कापडाच्या दुकानात काम केले. काही महिन्यांनंतर याच परिसरात कापडाचा कारखाना सुरू केला. बँकेतून कर्ज घेऊन त्याने पार्वतीनगर परिसरात आलिशान घर बांधले. परंतु, बँकेचे हप्ते फेडण्यात असमर्थ ठरल्याने बँकेने त्याचे घर जप्त केले होते. याचदरम्यान त्याच्या कारखान्यालाही आग लागली होती. त्यामुळे दीड वर्षापूर्वी तो कुटुंबासह नागपुरात परतला. अमरावतीला असताना तब्बल एक वर्ष तो बेपत्ता होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेले होते, अशी माहिती आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top