- रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
- आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशारा
कोरपना -
कोरपना तालुक्यातील कातलाबोडि ते येरगव्हान या रस्ताची अनेक दिवसा पासून दैन्यावस्था झाली आहे. हा रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचं पाणी खड्यात साचत आहे. खड्यात पाणी साचल्यामुळे रस्ताने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे कातलाबोडी येरगव्हान येथील अनेक नागरिकांना कामासाठी व त्या बाजूच्या गावकऱ्यांना कोरपना येथे यावे लागत असल्यामुळे नागरिकांनीच आता या रस्त्याची संबंधित विभागाने पाहणी करत लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशारा कवडू गोताडे व गावकऱ्यांनी दिला दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.