Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जमिनीचे सर्वे करून भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीचे पट्टे द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे १९४५ ते १९५० पासुन श...

  • विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -

जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे १९४५ ते १९५० पासुन शेतकरी शेतीची मशागत करून आपले उदरनिर्वाह करून आपल्या पाल्यांना जगवत आहे. तरी ५० ते ५५ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा आता पर्यंत आम्हाला आमच्या शेतमालकीचे हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या कोणताच योजनेचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या विविध योजनेपासून भूमिहीन शेतकरी वंचित राहत आहे. अतिदुर्गम जिवती पहाडावर कोणतेच उद्योग-धंदे नाहीं मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे व मुलाबाळांचे भविष्य घडवायचे कसे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणसाठी सुद्धा सात बाराची अट सरकारने लादली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता शिक्षणापासूनही वंचित राहणार कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी व पालकमंत्रानी मंत्रीमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडून कायद्यामध्ये सुधारणा करून भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी समितीचे जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड यांनी दिला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top