Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "हर भूके को भोजन" या उपक्रमा मार्फ़त गरिबांना १० रुपयात भोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरातील महिलांची संस्था "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन" चा उपक्रम गरीबांसाठी ठरतोय वरदान रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्ला...
  • बल्लारपुरातील महिलांची संस्था "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन" चा उपक्रम गरीबांसाठी ठरतोय वरदान

रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
लॉक डाउन मुळे अनेकांचे रोजगार गेले. हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारी ची वेळ आली, म्हणूनच बल्लारपुरातील महिलांची संस्था "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन" तर्फे गरीबांसाठी १० रुपयात उत्तम भोजन ची व्यवस्था करण्यात आली आहे. बल्लारपुरातील महिलांच्या या पुढाकारने शेकडो गरिबांच्या पोटाला आधार झाला आहे. कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थितिने गोर गरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता महिलानी सुरु केलेला हा उपक्रम गरीबांसाठी वरदान ठरणार आहे. 
सोमवारी  मिक्सवेज करी आणि राइस, मंगलवारी राजमा करी राइस, बुधवारी बरबटी करी आणि राइस, गुरवारी कालाचना आणि जीरा राइस, शुक्रवारी नुट्रिला करी आणि राइस, शनिवारी मोठ आणि राइस तर रविवारी काबुली चना आणि जीरा राइस असा चवदार मेनू असणार आहे. 
आज बल्लारपुरातील नगर पालिकेच्या बचत भवन येथे या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व धर्म समभाव ची भावना ठेवत सर्व धर्माचे व्यक्तींना अतिथि म्हणुन बोलविण्यात आले. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात बल्लारपुरातील प्रसिद्ध डॉक्टर नितिन कल्लूवार प्रमुख अतिथि म्हणुन मंचावर उपस्थित होते. 
बल्लारपुरातील "रणरागिनी हीरकणी फाउंडेशन" ची अध्यक्ष्या डॉ मंजूषा कल्लूवार सह संस्थेचे सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची ही कामगिरी गरीबांसाठी फार मोलाची ठरणार आहे. हेच नाही तर या संस्थे तर्फे कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून शेकडो गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून अनेकांना जीवनदान देऊन समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच जे कोरोना रुग्ण होम आइसोलेशन मध्ये होते त्यांना मोफत जेवन पुरविण्याचे काम सुद्धा या महिलांच्या संस्थे तर्फे करण्यात आले होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top