Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदुर येथे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंग शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर येथे कोरपना तालुका काँग्रेस कमिटी गडचांदूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीन अखील भार...

धनराजसिंग शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथे कोरपना तालुका काँग्रेस कमिटी गडचांदूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीन अखील भारतीय राष्टीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवस महात्मा गांधी विद्यालयच्या प्रांगणात संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ सविताताई टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमात राहुल गांधी व गांधी घराण्याबाबत देशासाठी बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या बाबत माहिती देण्यात आली. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान होतील व भारताला महासत्ता देश म्हणुन ओळखल्या जाईल असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थीपे यांनी व्यक्त केली. व्यापारी संघाचे अध्यक्ष हंसराज चौधरी व गटनेता विक्रम येरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या पुढील उज्ज्वल भविष्या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचीत्य साधुन गरजू लोकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्वात राज्यात सर्वाधिक जागा मिळवून आणि परत देशात पक्षाला सत्तेत आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचा संकल्प उपस्थित सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

कार्यक्रमास सभापती राहुल उमरे, नगरसेवक पापाय्या पोंनामवार, अरविंद मेश्राम, जयश्रीताई ताकसांडे, माजी शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे, महिला शहर अध्यक्ष अर्चनाताई आंबेकर, एन एस यु आय तालुका अध्यक्ष प्रीतम सातपुते, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे, राहुल ताकसांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते संचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी तर आभार तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top