- आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा
- ना. छगन भुजबळ यांचे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन
आज 22 जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. छगन भुजबळ यांची भेट घेत चर्चा केली व मागणीचे निवेदन सादर केले . यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले , महाराष्ट्र शासनाद्वारे धान उत्पादक शेतक-यांना एप्रिल महिन्यामध्येच त्यांच्या हक्काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्याचा मध्य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे ,याकडे त्यांनी छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले.
सध्या शेतीचे कामे सुरु झाले असताना गोरगरिब शेतक-यांना शेतीविषय साहित्य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैश्यांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्यात आले नसल्यामुळे गोरगरिब शेतक-यांवरती अन्याय होत आहे. शासन शेतक-यांची आर्थिक कोंडी करुन त्यांच्यावरती अन्याय करीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे .त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस त्वरित देण्यात यावा असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.