Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंबुजा सिमेंटच्या लापरवाहीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रान्सपोर्ट एरियात असलेल्या पुलाचे पाणी दाब मारून शेतात बैलजोडी, चारा आणि गोट्यात असलेले बी-बियाणे गेले वाहून शिवसेना नेते बबनराव उरुकुडे य...
  • ट्रान्सपोर्ट एरियात असलेल्या पुलाचे पाणी दाब मारून शेतात
  • बैलजोडी, चारा आणि गोट्यात असलेले बी-बियाणे गेले वाहून
  • शिवसेना नेते बबनराव उरुकुडे यांची कंपनी प्रशासनानी आर्थिक मदत देण्याची मागणी
अनंता गोखरे - आमचा विदर्भ
राजुरा -
उपरवाही स्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्सपोर्ट नगर एरियात असलेल्या पुलाच्या ब्लॉॅकेज मुळे लगतच्या परिसरातील राजूरकर नामक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलालगत त्यांचे शेत लागून असून पाणी ब्लॉक झाल्यामुळे पूर्ण पाणी शेतात घुसले. शेतात असलेल्या गोट्यातील बैलजोडी, खत, औषधी, चारापाणी पूर्णपणे वाहून गेले. पुलाचे बांधकाम छोट्या पाईपचे असल्यामुळे दरवर्षी ब्लॉकेज होते. शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी अधिकाऱ्याला माहिती देऊन पुलाचा पेसेज वाढवण्याची विनंती केली होती. परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनाथ नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते बबनराव उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित शेतकऱ्याची आर्थिक मदत करून पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. याप्रसंगी केतन बोभाटे, हल तुफान गिरी, साईनाथ पिंपळशेंडे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top