Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कृषी निविष्ठांच्या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अत्यावश्यक सेवेंची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ (नेर) - दि. 15 : जिल्ह्यात 'ब्रेक द चेन...

  • अत्यावश्यक सेवेंची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
दि. 15 : जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत 15 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहे. मात्र शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बी-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र  यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.

सदर कालावधीत दुकानातील विक्री सोबतच शेतक-यांना व्हॉट्सॲप / मोबाईल कॉलद्वारे माहिती देऊन कृषी निविष्ठा होम डिलीव्हरी (घरपोच विक्री) करण्याच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी कार्यवाही करावी. जेणेकरून शेतक-यांच्या सोयीनुसार विक्री व गर्दी टाळण्यास मदत होईल. सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर कोव्हीड त्रिसुत्रींचे पालन होण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी (राज्य तसेच जि.प.) यांनी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनाधारकांनी दुकानात नागरिकांची गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलीवरीद्वारे वस्तुंचा पुरवठा करावा. यासाठी आस्थापनाधारकांनी स्वत:चा व्हॉट्सॲप क्रमांक दुकानासमोर प्रसिध्द करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तुंचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष येणा-या ग्राहकांची संख्या कमी होईल. 

नगर परिषद / नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अत्यावश्यक दुकानांच्या आस्थापनाधारकांकडून अत्यावश्यक वस्तुंची विक्री जास्तीत जास्त होम डिलीवरी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यात ग्रामस्तरीय समित्यांनी व शहरातील प्रभागस्तरीय समित्यांनी आवश्यकतेनुसार अशासकीय संस्थांची मदत घेऊन कार्यवाही करावी. अत्यावश्यक वस्तु / सेवा पुरविणारे आस्थापनाचालक, त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलीवरी करणा-या कर्मचा-यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोव्हीड चाचणी निगेटिव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोव्हीड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून 15 दिवसांपर्यंत वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीत निगेटिव्ह अहवाल नसल्यास पहिल्या वेळेस 100 रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळेस 200 रुपये दंड आकारण्यात येईल.

याव्यतिरिक्त यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील सर्व सुचना व आदेश पुर्वीप्रमाणे लागू राहतील. सदर आदेश पुढील आदेशापर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, कलम 188 व इतर संबंधित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top