- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन
यवतमाळ -
आज देशात आपल्याला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी तसेच दैनंदिन जीवनातील सर्वसामान्यांना जनतेला आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त होऊन जगावे लागत आहे राजस्थानी खताच्या किमती30 टक्क्यांनी वाढलेले आहे तसेच बियाणे च्या सुद्धा किमती वाजवीपेक्षा जास्त वाढलेले आहे इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीने तर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे घराची आर्थिक घडी ही पूर्ण कपडे अस्ताव्यस्त झालेली आहे आता तर घरगुती गॅस हजार रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे उज्वला च्या नावाखाली गरिबांना फुकट कनेक्शन देऊन आता हजार रुपयांचा भुर्दंड त्यांच्यावर बसवला आहे शेतमजुरांनी तर आता परत चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केली आहे करोणा सारख्या महामारी ने अनेकांच्या नोकऱ्या गेलेले आहे काही कुटुंबातील कुटुंब प्रमुखच करोणा मुळे जग सोडून निघून गेल्यामुळे आधीच कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आलेली आहे अशाही परिस्थितीत भाजपाप्रणीत केंद्र सरकारने या सर्व वरील वस्तूच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेवर शेतकऱ्यावर अच्छे दिन आणून ठेवलेले आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबरकर पाटील यांच्या नेतृत्वात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्हा बँक उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले महिला प्रदेश सरचिटणीस क्रांती धोटे राऊत, महिला जिल्हाध्यक्ष सारिका ताजणे, तारीक लोखंडवाला, माजी समाज कल्याण सभापती लता खांदवे, लाला राऊत, दत्ता गंगासागर, रंजना आडे, मतीन भाई, नयन लुंगे, प्रकाश राठोड, अमित नारसे, चंद्रकांत ताजने, मन चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.