राजुरा -
आज आठवडा चा पहिला दिवस असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी १४४ कलमे व ताळेबंदी आणि जमावबंदी चे उल्लंघन दिसून येत आहे.
मागील एक महिन्या पासून कोरोनाचा उद्रेक व वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात जमावबंदी लागू केली होती. जमावबंदी १ जून ला संपणार होती परंतु काही कारणास्तव ब्रेक द चैन अंतर्गत जमावबंदी व ताळेबंदीला १५ जून पर्यंत वाढविण्यात आले.
पुन्हा १५ दिवस घरात बसावे लागेल ह्या भीतीपोटी शहरातील विविध भागात नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची आस्थापने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू असल्यामुळे दुकानांत ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. आताही लोक विनामास्क ने फिरतांना दिसतात. बाजारात गर्दीमुळे सोशल डिस्टेंसिंग चे पालन योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे तहसील, नप प्रशासनाने सातत्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मागील एक महिन्या पासून कोरोनाचा उद्रेक व वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात जमावबंदी लागू केली होती. जमावबंदी १ जून ला संपणार होती परंतु काही कारणास्तव ब्रेक द चैन अंतर्गत जमावबंदी व ताळेबंदीला १५ जून पर्यंत वाढविण्यात आले.
पुन्हा १५ दिवस घरात बसावे लागेल ह्या भीतीपोटी शहरातील विविध भागात नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची आस्थापने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू असल्यामुळे दुकानांत ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. आताही लोक विनामास्क ने फिरतांना दिसतात. बाजारात गर्दीमुळे सोशल डिस्टेंसिंग चे पालन योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे तहसील, नप प्रशासनाने सातत्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.