Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना विस्फोट - चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 492 नवे रुग्ण ; दोन बाधितांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 259 जणांनी को...

  • मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 492 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 863 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 412 झाली आहे. सध्या 3009 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 85 हजार 598 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 51 हजार 801 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये जीवती येथील 61 वर्षीय पुरूष व उर्जानगर, चंद्रपूर 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 442 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 402, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.492 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 159, चंद्रपूर तालुका 54, बल्लारपूर 27, भद्रावती 103, ब्रम्हपुरी 27, नागभिड 20, सिंदेवाही पाच, मूल 11, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजूरा सहा, चिमूर 18, वरोरा 27, कोरपना 22, जीवती एक व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top