- जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम 2021 मध्ये कृषी निविष्ठांच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधिक्षक खांडेराव धरणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प.कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीमध्ये आवश्यक बियाणे व खते, याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना अप्रमाणित कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. तसेच कृषी निविष्ठांची परिणामकारक गुणवत्ता तपासणी होण्यासाठी आणि खरीप हंगामात कृषी निविष्ठांच्या संदर्भात तक्रारी येऊ देऊ नका. शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या 17 भरारी पथकापर्यंत तपासणी कराव्यात व अनधिकृत बियाणे व खतांबाबत कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
अवैधरित्या अनधिकृत कापूस बियाण्यांची (एचटीबीटी) वाहतूक, वितरण, विक्री व साठवणूक होवू नये याकरीता भरारी पथकांपर्यंत तपासण्या करून कारवाई करावी. कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. तसेच खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेले घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.
बैठकीला महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. गावंडे, कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पालतेवार आणि सचिव कमल बागडे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.